ब्रह्मपुरी/चंद्रपूर:* चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराने आज देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, ब्रह्मपुरी येथे आज कमाल तापमान *47.2 अंश सेल्सिअस* इतके नोंदवले गेले.
संपूर्ण देशात सध्या उष्णतेची लाट असली तरी, विदर्भातील ब्रह्मपुरीने सर्व शहरांना मागे टाकत ‘सर्वात उष्ण शहर’ चा मान पटकावला आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत.
*आरोग्य विभागाचा इशारा*
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधणे आवश्यक आहे.
विदर्भाला ‘देशाचा तवा’ का म्हणतात, हे ब्रह्मपुरीने आज पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
brahmapuri-chandrapur-highest-temperature-india-47-degrees`

Very good news 🙏🙏
👍🙏🙏
धन्यवाद 🙏